Crop insurance khari rabbi mahiti : महाराष्ट्र राज्यात दुष्काळ परिस्थितीमुळे शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक महसूल मंडळामध्ये ज्या ज्या ठिकाणी दुष्काळाचे सावट आहे त्या ठिकाणी हे सर्वेक्षण जिल्हाधिकारी मार्फत करण्यात आले आहे. ज्या ज्या महसूल मंडळामध्ये शेतमालाची नुकसान 50 टक्के पेक्षा जास्त आहे त्या त्या महसूल मंडळात अग्रीम पीक विमा वाटप सुरू झालेले आहेत त्यानंतर जी शेवटची फायनल रक्कम असणारे ते सुद्धा सरकार वाटण्याच्या तयारीत आहेत.
Crop insurance khari rabbi mahiti : बीड जिल्ह्यात या संदर्भात एक माहिती समोर आलेली आहे काहींना अग्रीम पीक विमा वाटप भेटलेच नाही महत्त्वाच्या म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये शेतमालाचे नुकसानी 50% पेक्षा सुद्धा जास्त होते. एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 1 लाख 11 हजार 601शेतकऱ्यांना या अग्रीम पीक विम्याचा लाभ जवळ 76 कोटी 27 लाख रुपये इतका मंजूर करण्यात आला होता. आता तो थेट शेतकरी लाभार्थी आहे त्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत पाठवण्यात आलेला आहे. अशी माहिती आपल्याला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यामार्फत ट्विटर देण्यात आली आहे.

खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाच्या खंडाने नुकसान झालेल्या व पहिल्या टप्प्यात अग्रीम न मिळालेल्या बीड जिल्ह्यातील 1 लाख 11 हजार 601 शेतकऱ्यांना अग्रीमचा 76 कोटी 27 लाख रुपये इतका दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला असून याचे वितरण थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांवर करण्यास सुरुवात झाली… pic.twitter.com/GJ1OEsvofW
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 12, 2024
सध्या महाराष्ट्रामध्ये खरीप पिक विमा आणि रब्बी पिक विमा या पिक विम्याचे पैसे जमा होत आहे तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर जर हे पिक विमा चे पैसे आले नसेल तर तुम्ही या संदर्भात कृषी विभागाकडे चौकशी करू शकता. ऑनलाइन पद्धतीने पिक विमा चे पैसे आले का नाही चेक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता आणि त्या ठिकाणी जाऊन तुमच्या अकाउंट वर किती पैसे जमा झाले ते पाहू शकता.
पिक विमा पैसे जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा